‘मन माझे चपळ न राहे निश्चळ ।
घडी एकी पळ स्थिर नाही ॥
आता तू उदास नव्हे नारायण ।
धावे मज दीना गांजियेले ॥
धाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी ।
केले तडातोडी चित्त माझे ॥
तुका म्हणे माझा न चले सायास ।
राहिलो मी आस धरूनी तुझी ॥
हा अभंग सोपा व सुलभ आहे. यात महाराजांची निराशा उत्कटपणे व्यक्त झाली आहे. ‘रामकृष्ण हरी’ या मंत्राचा जप करूनही मन ताळ्यावर येत नाही, म्हणून महाराज शेवटी विठ्ठलालाच शरण गेले! मन हे असे दुर्धर्ष व बलदंड असते. मनाशी दोन हात करणे हे सोपे काम नसते! फार मोठे पुण्यबळ, गुरुकृपेचे चंद्रबळ गाठी असल्याशिवाय मनोजय केवळ अशक्य!
घडी एकी पळ स्थिर नाही ॥
आता तू उदास नव्हे नारायण ।
धावे मज दीना गांजियेले ॥
धाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी ।
केले तडातोडी चित्त माझे ॥
तुका म्हणे माझा न चले सायास ।
राहिलो मी आस धरूनी तुझी ॥
हा अभंग सोपा व सुलभ आहे. यात महाराजांची निराशा उत्कटपणे व्यक्त झाली आहे. ‘रामकृष्ण हरी’ या मंत्राचा जप करूनही मन ताळ्यावर येत नाही, म्हणून महाराज शेवटी विठ्ठलालाच शरण गेले! मन हे असे दुर्धर्ष व बलदंड असते. मनाशी दोन हात करणे हे सोपे काम नसते! फार मोठे पुण्यबळ, गुरुकृपेचे चंद्रबळ गाठी असल्याशिवाय मनोजय केवळ अशक्य!